DNA चा झोल अन् डोक्यात केमिकल लोच्या....!
नुकताच कराड येथील एका राजकीय कार्यक्रमामधे एक वानर सर्व झेड प्लस सुरक्षा व्यवस्था(?)भेदून मंचा समोर जाऊन बसले. व्यासपीठावर नेते मंडळी,खाली वानर. थोडीफार भितीयुक्त मनोरंजन झाले.परंतु माझ्या मनात विचार आला तो म्हणजे वानराला सुद्धा आपल्या उत्क्रांत पिढीतील नेत्यांबद्ल उत्सुकता असावी. मात्र नेत्यांचे साचेबद्ध बोलणं अन् आपणच कसे योग्य तारणहार आहोत ह्या त्यांच्या अर्विभावातून लोकांना गृहित धरून केलेल्या अश्वासनांची भाषणबाजी ऐकून हे अजूनही माकडचेष्टाच करीत आहेत याची जाणीव त्याला झाल्याने काहीशा भ्रमनिराशेने तसेच आपण माकडच राहण्याचा योग्य निर्णय घेतल्याचे समाधान मानत ते आले तसे निघून गेले.
मग मला नुकत्याच बिहार निवडणुकीनंतर शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांचे ' कुणाच्या DNAत मला जाब विचारण्याची हिम्मत आहे 'असे विधान केले होते त्याची आठवण झाली. एखादी गोष्ट करण्यासाठी तुमच्या DNA तच ती असावी लागते असा त्यांचा दावा होता. जाब विचारण्यासाठी तुमच्याकडे ते गुण अंगभूत असावे लागतात नाहीतर न विरोध करता निमुटपणे सहन करत त्याला सहिष्णुतेचे नाव देत आत्मिक समाधान मानत राहणे एवढाच पर्याय शिल्लक राहतो.क्रिया-प्रतिक्रिया हे जरी नैसर्गिक असले तरी लोहा लोहे को काटता है अशा फिल्मी ज्ञाना बरोबरच आगीला आग नव्हे तर पाणीच थांबवू शकते हे सामान्यज्ञान असणे आवश्यक असते. तेव्हा सद्याची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता हिंसकपणा प्रचंड वाढला असुन त्याचे मुळ कारण सहनशीलतेची घसरलेली क्षमता अन् त्यामुळेच विचाराने, जीभेने सोडलेली पातळी एखादी परिस्थिती अजूनच बिघडवू शकते. कधी कधी सारखी सारखी केलेल्या बडबडीपेक्षा मौनात त्याचे उत्तर सापडू शकते. शब्दाने शब्द वाढत भांड्याला भांडं लागण्यापेक्षा मौन तुम्हाला आत्मपरीक्षण करण्यासाठी भाग पाडतं. तेव्हा देशाला सहिष्णू-असहिष्णूचे लेबल लावत फिरण्यापेक्षा भौतिक विकासाच्या स्पर्धात्मक युगात वैयक्तिक पातळीवर प्रत्येकजण अस्थिर व पर्यायाने आक्रामक झालो आहोत हे प्रामाणिकपणे मान्य केले पाहिजे. केवळ आपापली मते मांडणे म्हणजे स्वातंत्र्य नसून समाज शांत, सुसंस्कृत असणे अधिक गरजेचे आहे. छानछोकी जीवनशैली चे आकर्षण व त्याला पोषक आजुबाजूची साधने यामुळे आपल्या DNA चा झोल झाला असल्याचे लक्षण असुन त्यामुळे आपल्या डोक्यात केमिकल लोच्या झाला आहे.
एखादा दोष वारंवार दाखवत बसल्याने आपली प्रतिमा तुसडी होण्याची शक्यता अधिक असते. एखादी रेष पुसून कमी करण्यापेक्षा तीच्या शेजारी आणखी मोठी रेष काढून तिचा खुजेपणा दाखविता आला पाहिजे. त्याप्रमाणेच नुसते दोष काढत बसण्यापेक्षा चांगल्या योग्य गोष्टीचा अवलंब तसेच त्याचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. त्यासाठी जी लोकं समाजासाठी काम करतात, ज्यांचा जनमानसावर प्रभाव असतो अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपापल्या वागण्या बोलण्याबाबत अधिक जागरूक असणे महत्वाचे आहे. जीभेला झालेली जखम लवकर बरी होते परंतू जीभेने केलेली जखम लवकर बरी होत नाही.शत प्रतिशत योग्य असे काही असू शकत नाही त्यामुळे काही समाजकंटक लोकं अशा परिस्थितीचा गैरफायदा घेत स्वतःचे भले करण्यात गुंतलेले असतात. मदारी ज्याप्रमाणे माकडाचा वापर करीत खेळ मांडत स्वतःचे पोट भरत असतो त्याप्रमाणेच काही मंडळी आपल्याला माकडाप्रमाणे त्यांच्या तालावर नाचवत स्वतःचा सत्तास्वार्थ साधत असतात.
गरज आहे ती आपण तटस्थपणे पाहण्याची व स्वतःच स्वतःला सावरण्याची. चांगले व्यक्तिमत्व असण्यासाठी आपल्यातील चांगले अस्तित्व जपले पाहिजे." शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी "या संत तुकारामांच्या उक्ति प्रमाणे आपल्या येणाऱ्या पिढीवर योग्य संस्कार झाले पाहिजेत तरच त्यांच्या DNAतील झोल दुरूस्त होईल व त्यामुळे डोक्यातील केमिकल लोच्या थांबून योग्य वैचारिक मानसिकता प्राप्त होऊन तीचे कृतीत रूपांतर होईल.
संदिप महामुनी
९६३७१३०२०६
नुकताच कराड येथील एका राजकीय कार्यक्रमामधे एक वानर सर्व झेड प्लस सुरक्षा व्यवस्था(?)भेदून मंचा समोर जाऊन बसले. व्यासपीठावर नेते मंडळी,खाली वानर. थोडीफार भितीयुक्त मनोरंजन झाले.परंतु माझ्या मनात विचार आला तो म्हणजे वानराला सुद्धा आपल्या उत्क्रांत पिढीतील नेत्यांबद्ल उत्सुकता असावी. मात्र नेत्यांचे साचेबद्ध बोलणं अन् आपणच कसे योग्य तारणहार आहोत ह्या त्यांच्या अर्विभावातून लोकांना गृहित धरून केलेल्या अश्वासनांची भाषणबाजी ऐकून हे अजूनही माकडचेष्टाच करीत आहेत याची जाणीव त्याला झाल्याने काहीशा भ्रमनिराशेने तसेच आपण माकडच राहण्याचा योग्य निर्णय घेतल्याचे समाधान मानत ते आले तसे निघून गेले.
मग मला नुकत्याच बिहार निवडणुकीनंतर शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांचे ' कुणाच्या DNAत मला जाब विचारण्याची हिम्मत आहे 'असे विधान केले होते त्याची आठवण झाली. एखादी गोष्ट करण्यासाठी तुमच्या DNA तच ती असावी लागते असा त्यांचा दावा होता. जाब विचारण्यासाठी तुमच्याकडे ते गुण अंगभूत असावे लागतात नाहीतर न विरोध करता निमुटपणे सहन करत त्याला सहिष्णुतेचे नाव देत आत्मिक समाधान मानत राहणे एवढाच पर्याय शिल्लक राहतो.क्रिया-प्रतिक्रिया हे जरी नैसर्गिक असले तरी लोहा लोहे को काटता है अशा फिल्मी ज्ञाना बरोबरच आगीला आग नव्हे तर पाणीच थांबवू शकते हे सामान्यज्ञान असणे आवश्यक असते. तेव्हा सद्याची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता हिंसकपणा प्रचंड वाढला असुन त्याचे मुळ कारण सहनशीलतेची घसरलेली क्षमता अन् त्यामुळेच विचाराने, जीभेने सोडलेली पातळी एखादी परिस्थिती अजूनच बिघडवू शकते. कधी कधी सारखी सारखी केलेल्या बडबडीपेक्षा मौनात त्याचे उत्तर सापडू शकते. शब्दाने शब्द वाढत भांड्याला भांडं लागण्यापेक्षा मौन तुम्हाला आत्मपरीक्षण करण्यासाठी भाग पाडतं. तेव्हा देशाला सहिष्णू-असहिष्णूचे लेबल लावत फिरण्यापेक्षा भौतिक विकासाच्या स्पर्धात्मक युगात वैयक्तिक पातळीवर प्रत्येकजण अस्थिर व पर्यायाने आक्रामक झालो आहोत हे प्रामाणिकपणे मान्य केले पाहिजे. केवळ आपापली मते मांडणे म्हणजे स्वातंत्र्य नसून समाज शांत, सुसंस्कृत असणे अधिक गरजेचे आहे. छानछोकी जीवनशैली चे आकर्षण व त्याला पोषक आजुबाजूची साधने यामुळे आपल्या DNA चा झोल झाला असल्याचे लक्षण असुन त्यामुळे आपल्या डोक्यात केमिकल लोच्या झाला आहे.
एखादा दोष वारंवार दाखवत बसल्याने आपली प्रतिमा तुसडी होण्याची शक्यता अधिक असते. एखादी रेष पुसून कमी करण्यापेक्षा तीच्या शेजारी आणखी मोठी रेष काढून तिचा खुजेपणा दाखविता आला पाहिजे. त्याप्रमाणेच नुसते दोष काढत बसण्यापेक्षा चांगल्या योग्य गोष्टीचा अवलंब तसेच त्याचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. त्यासाठी जी लोकं समाजासाठी काम करतात, ज्यांचा जनमानसावर प्रभाव असतो अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपापल्या वागण्या बोलण्याबाबत अधिक जागरूक असणे महत्वाचे आहे. जीभेला झालेली जखम लवकर बरी होते परंतू जीभेने केलेली जखम लवकर बरी होत नाही.शत प्रतिशत योग्य असे काही असू शकत नाही त्यामुळे काही समाजकंटक लोकं अशा परिस्थितीचा गैरफायदा घेत स्वतःचे भले करण्यात गुंतलेले असतात. मदारी ज्याप्रमाणे माकडाचा वापर करीत खेळ मांडत स्वतःचे पोट भरत असतो त्याप्रमाणेच काही मंडळी आपल्याला माकडाप्रमाणे त्यांच्या तालावर नाचवत स्वतःचा सत्तास्वार्थ साधत असतात.
गरज आहे ती आपण तटस्थपणे पाहण्याची व स्वतःच स्वतःला सावरण्याची. चांगले व्यक्तिमत्व असण्यासाठी आपल्यातील चांगले अस्तित्व जपले पाहिजे." शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी "या संत तुकारामांच्या उक्ति प्रमाणे आपल्या येणाऱ्या पिढीवर योग्य संस्कार झाले पाहिजेत तरच त्यांच्या DNAतील झोल दुरूस्त होईल व त्यामुळे डोक्यातील केमिकल लोच्या थांबून योग्य वैचारिक मानसिकता प्राप्त होऊन तीचे कृतीत रूपांतर होईल.
संदिप महामुनी
९६३७१३०२०६