गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

शोधिसी नारायणा...!


कुलुपबंद देव्हाऱ्यात, देवा तुला शोधू कुठं....

Filter your needs


Traditional imprisonment....सांस्कृतिक बंदिवास....!

 
        स्त्रियां आजदेखिल रुढी परंपरेच्या जोखडात अडकून पडलेल्या आहेत अन् त्यातच ते समाधान शोधताहेत ही त्यांची बौद्धिक गुलामगिरीच अधोरेखित करते. मुक्त वातावरणात जगतानाही मानसिक दृष्ट्या बंदिवासच भोगताहेत...

रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

मोर्चात्सवाचे बळी.....!

                     मोर्चात्सवाचे बळी.....!

                 कोपर्डीच्या निमित्ताने निघणारे मराठा समाजाचे व्यापक मोर्चे मराठा समाजातील खदखद बाहेर पडत आहे याचेच द्योतक ठरते आहे.
                 पण अत्याचाराला जातीय चौकटीत बसवून आरक्षण व अँट्रॉसिटी मुद्यावर वातावरण निर्मिती केल्यामुळे तसेच आरक्षण हा न्यायप्रविष्ठ तर अँट्रॉसिटी हा केन्द्रीय व घटनात्मक विषय असल्यामुळे नेमके त्याचे फलित काय हा सद्य स्थितीला तरी अनुत्तरित प्रश्न आहे.मुक मोर्चातील शिस्त व स्वच्छता याचे नियोजन जरी कौतुकास्पद असले तरी ही वादळा पुर्वीची शांतता आहे यातून दुर्दैवी असा संख्याबळाचे दबाव तंत्र हाच घटक ठळकपणे अधोरेखित होतो आहे अन् माणूस अनुकरण प्रिय असल्यामुळे याची लागण सर्व समाजाला झाल्याशिवाय राहणार नाही.प्रत्येकजण कोणत्याही समस्येचे मुळ जमवा गर्दी अन् खेचा वर्दी अशाप्रकारच्या मार्गानेच जाईल.त्यातून प्रत्येक घटक असुरक्षित भावनेतून एकत्र येईल अन् त्यातून जातीय तेढ व एकमेका विषयी द्वेषच निर्माण होण्यास मदत मिळेल सरतेशेवटी जिसकी लाठी उसकी भैंस हाच फॉर्म्युला उपयुक्त ठरेल तो वापरताना मात्र एक मराठा=एक लाख या गणितानुसार एक माळी,एक महार, एक मुस्लिम,एक...,अनेक जाती जमाती बद्दल अनिभिज्ञ असल्यामुळे असंख्य एक म्हणजे किती हे ठरायचे आहे तसेच ते कोणी व कसे ठरवणार हे देखिल माहित नसल्यामुळे नेमके संख्याबळ समजू शकत नाही तेव्हा एकंदरीतच भारतीय लोकसंख्या नेमकी किती पटीने वाढणार आहे हे देखिल कळणार नाही तेव्हा या फॉर्म्युल्याने नेमके कोणाचे गणित सुटणार हे काळच ठरवेल मात्र ते लोकशाहीला व पर्यायाने भारत देशाच्या एकसंधतेला धोकादायक आहे एवढे नक्की.
                 वेडात दौडले सात हा इतिहासात शिवाजी महाराजांना पडलेला प्रश्न सद्यस्थितीला वेडात दौडणाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात गेली तरी जैसे थे असेल तर आपण शिक्षित झालो तरी शैक्षणिक दृष्ट्या प्रगल्भ झालो नाही हेच खरे.देशात इतरत्रही जाट, पटेल आरक्षणासाठी आंदोलन होत आहेत हे ही त्याचेच द्योतक आहे.परंतू देश रक्षणासाठी कार्यरत असलेले आपले सैन्य या विभागणीतून जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे तिथे केवळ भारतीय अन् तमाम भारतीयांचे रक्षण करण्याची दुर्दम्य ईच्छाशक्ती असणारेच जाऊ शकतात.ते लढताना महाराष्ट्रीयन, बिहारी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय... वैगरे अथवा हिंदू, मुस्लिम, शिख... मराठा, महार, ब्राह्मण...म्हणून लढत नाहीत.तेव्हा एकजुट असावी पण केवळ उत्साह व उत्सवी मानसिकतेने नव्हे तर समतोल विचाराने अन् राष्ट्रीय एकात्मतेसाठी व सर्वसमावेशक विकासासाठी एवढीच माफक अपेक्षा एक मुक साक्षीदार नागरिक म्हणून वाटते.
                             जय हिंद ।

व्यथाचित्र...!

         
                    व्यंगचित्राची ताकद काय असते हे सर्व जगाला माहिती आहे. हे माध्यम इतके प्रभावी अस्त्र आहे की जागतिक पातळीवर फ्रान्स मधे चार्ली हेब्दो या मासिकाने देखिल व्यंगचित्राचा प्रभाव अधोरेखित केला आहे.बाळासाहेब ठाकरें सारख्या उमद्या व्यंगचित्रकारानी त्यातून शिवसेने सारखा पक्ष उभा केला परंतू त्याच पक्षाच्या मुखपत्र असलेला सामना या वर्तमानपत्रातून परिस्थितीला विपरीत तसेच काळ विसंगत व्यंगचित्र छापले गेले त्यामुळे निर्माण झालेला जनक्षोभ व राजकीय पक्ष म्हणून असलेली अपरिहार्यता यामुळे संपादक व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जातीने जाहिर माफी मागावी लागली.इतपर्यंत ठिक परंतू त्या व्यंगचित्रकाराचे 'हसोबा प्रसन्न' हे सदरच गायब होणे वैयक्तिक रित्या मला अपेक्षाभंगाचे वाटते कारण व्यंगचित्र हे प्रभावी अस्त्रा बरोबरच दुधारी शस्त्र आहे याची जाणीव ठेवून कुंचल्याच्या फटकाऱ्या प्रमाणे जनक्षोभाचे वार सुद्धा झेलण्याची उर्मी व्यंगचित्रकाराच्या अंगी असली पाहिजे असे मला वाटते.असो लोकशाही आहे.

जाँबाज़.....

                   जाँबाज़.....

Giving a befitting reply by surgical strike for Uri attack at the place & time of it's own choice.Paying back Pakistan in the same coin with high morale.Without caring abt threat of being caught in Pakistan army's crosshairs our brave para commandos from Ghatak platoon 6 Bihar & 10 Dogra droped by Dhruv in POK,well equipped with Tavor,MP4,grenades, UBGL,night vision instrument with camera helmet cross 3km distance by crawling thru mud,rocks even landmines destroyed 7 terror launch pads with 50 terrorists & 2 Pak soldiers.
Images send by ISRO's Cartosat 2c satellite was useful for the operation.
Hat's off INDIAN ARMY...!