मोर्चात्सवाचे बळी.....!
कोपर्डीच्या निमित्ताने निघणारे मराठा समाजाचे व्यापक मोर्चे मराठा समाजातील खदखद बाहेर पडत आहे याचेच द्योतक ठरते आहे.
पण अत्याचाराला जातीय चौकटीत बसवून आरक्षण व अँट्रॉसिटी मुद्यावर वातावरण निर्मिती केल्यामुळे तसेच आरक्षण हा न्यायप्रविष्ठ तर अँट्रॉसिटी हा केन्द्रीय व घटनात्मक विषय असल्यामुळे नेमके त्याचे फलित काय हा सद्य स्थितीला तरी अनुत्तरित प्रश्न आहे.मुक मोर्चातील शिस्त व स्वच्छता याचे नियोजन जरी कौतुकास्पद असले तरी ही वादळा पुर्वीची शांतता आहे यातून दुर्दैवी असा संख्याबळाचे दबाव तंत्र हाच घटक ठळकपणे अधोरेखित होतो आहे अन् माणूस अनुकरण प्रिय असल्यामुळे याची लागण सर्व समाजाला झाल्याशिवाय राहणार नाही.प्रत्येकजण कोणत्याही समस्येचे मुळ जमवा गर्दी अन् खेचा वर्दी अशाप्रकारच्या मार्गानेच जाईल.त्यातून प्रत्येक घटक असुरक्षित भावनेतून एकत्र येईल अन् त्यातून जातीय तेढ व एकमेका विषयी द्वेषच निर्माण होण्यास मदत मिळेल सरतेशेवटी जिसकी लाठी उसकी भैंस हाच फॉर्म्युला उपयुक्त ठरेल तो वापरताना मात्र एक मराठा=एक लाख या गणितानुसार एक माळी,एक महार, एक मुस्लिम,एक...,अनेक जाती जमाती बद्दल अनिभिज्ञ असल्यामुळे असंख्य एक म्हणजे किती हे ठरायचे आहे तसेच ते कोणी व कसे ठरवणार हे देखिल माहित नसल्यामुळे नेमके संख्याबळ समजू शकत नाही तेव्हा एकंदरीतच भारतीय लोकसंख्या नेमकी किती पटीने वाढणार आहे हे देखिल कळणार नाही तेव्हा या फॉर्म्युल्याने नेमके कोणाचे गणित सुटणार हे काळच ठरवेल मात्र ते लोकशाहीला व पर्यायाने भारत देशाच्या एकसंधतेला धोकादायक आहे एवढे नक्की.
वेडात दौडले सात हा इतिहासात शिवाजी महाराजांना पडलेला प्रश्न सद्यस्थितीला वेडात दौडणाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात गेली तरी जैसे थे असेल तर आपण शिक्षित झालो तरी शैक्षणिक दृष्ट्या प्रगल्भ झालो नाही हेच खरे.देशात इतरत्रही जाट, पटेल आरक्षणासाठी आंदोलन होत आहेत हे ही त्याचेच द्योतक आहे.परंतू देश रक्षणासाठी कार्यरत असलेले आपले सैन्य या विभागणीतून जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे तिथे केवळ भारतीय अन् तमाम भारतीयांचे रक्षण करण्याची दुर्दम्य ईच्छाशक्ती असणारेच जाऊ शकतात.ते लढताना महाराष्ट्रीयन, बिहारी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय... वैगरे अथवा हिंदू, मुस्लिम, शिख... मराठा, महार, ब्राह्मण...म्हणून लढत नाहीत.तेव्हा एकजुट असावी पण केवळ उत्साह व उत्सवी मानसिकतेने नव्हे तर समतोल विचाराने अन् राष्ट्रीय एकात्मतेसाठी व सर्वसमावेशक विकासासाठी एवढीच माफक अपेक्षा एक मुक साक्षीदार नागरिक म्हणून वाटते.
जय हिंद ।
कोपर्डीच्या निमित्ताने निघणारे मराठा समाजाचे व्यापक मोर्चे मराठा समाजातील खदखद बाहेर पडत आहे याचेच द्योतक ठरते आहे.
पण अत्याचाराला जातीय चौकटीत बसवून आरक्षण व अँट्रॉसिटी मुद्यावर वातावरण निर्मिती केल्यामुळे तसेच आरक्षण हा न्यायप्रविष्ठ तर अँट्रॉसिटी हा केन्द्रीय व घटनात्मक विषय असल्यामुळे नेमके त्याचे फलित काय हा सद्य स्थितीला तरी अनुत्तरित प्रश्न आहे.मुक मोर्चातील शिस्त व स्वच्छता याचे नियोजन जरी कौतुकास्पद असले तरी ही वादळा पुर्वीची शांतता आहे यातून दुर्दैवी असा संख्याबळाचे दबाव तंत्र हाच घटक ठळकपणे अधोरेखित होतो आहे अन् माणूस अनुकरण प्रिय असल्यामुळे याची लागण सर्व समाजाला झाल्याशिवाय राहणार नाही.प्रत्येकजण कोणत्याही समस्येचे मुळ जमवा गर्दी अन् खेचा वर्दी अशाप्रकारच्या मार्गानेच जाईल.त्यातून प्रत्येक घटक असुरक्षित भावनेतून एकत्र येईल अन् त्यातून जातीय तेढ व एकमेका विषयी द्वेषच निर्माण होण्यास मदत मिळेल सरतेशेवटी जिसकी लाठी उसकी भैंस हाच फॉर्म्युला उपयुक्त ठरेल तो वापरताना मात्र एक मराठा=एक लाख या गणितानुसार एक माळी,एक महार, एक मुस्लिम,एक...,अनेक जाती जमाती बद्दल अनिभिज्ञ असल्यामुळे असंख्य एक म्हणजे किती हे ठरायचे आहे तसेच ते कोणी व कसे ठरवणार हे देखिल माहित नसल्यामुळे नेमके संख्याबळ समजू शकत नाही तेव्हा एकंदरीतच भारतीय लोकसंख्या नेमकी किती पटीने वाढणार आहे हे देखिल कळणार नाही तेव्हा या फॉर्म्युल्याने नेमके कोणाचे गणित सुटणार हे काळच ठरवेल मात्र ते लोकशाहीला व पर्यायाने भारत देशाच्या एकसंधतेला धोकादायक आहे एवढे नक्की.
वेडात दौडले सात हा इतिहासात शिवाजी महाराजांना पडलेला प्रश्न सद्यस्थितीला वेडात दौडणाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात गेली तरी जैसे थे असेल तर आपण शिक्षित झालो तरी शैक्षणिक दृष्ट्या प्रगल्भ झालो नाही हेच खरे.देशात इतरत्रही जाट, पटेल आरक्षणासाठी आंदोलन होत आहेत हे ही त्याचेच द्योतक आहे.परंतू देश रक्षणासाठी कार्यरत असलेले आपले सैन्य या विभागणीतून जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे तिथे केवळ भारतीय अन् तमाम भारतीयांचे रक्षण करण्याची दुर्दम्य ईच्छाशक्ती असणारेच जाऊ शकतात.ते लढताना महाराष्ट्रीयन, बिहारी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय... वैगरे अथवा हिंदू, मुस्लिम, शिख... मराठा, महार, ब्राह्मण...म्हणून लढत नाहीत.तेव्हा एकजुट असावी पण केवळ उत्साह व उत्सवी मानसिकतेने नव्हे तर समतोल विचाराने अन् राष्ट्रीय एकात्मतेसाठी व सर्वसमावेशक विकासासाठी एवढीच माफक अपेक्षा एक मुक साक्षीदार नागरिक म्हणून वाटते.
जय हिंद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा