शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

काळवंडलेल्या स्वातंत्र्याचा दीनपणा....!

काळवंडलेल्या स्वातंत्र्याचा दीनपणा....!

गोरखपुर,उत्तरप्रदेश येथिल बाबा राघवदास मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटल मधे कृत्रिम अॉक्सिजन वीना ६३ जणांचा मृत्यू झाला त्यामधे जवळपास ३२ लहान बालकांचा समावेश आहे.कृत्रिम अॉक्सिजन पुरवठा करणाऱ्याचे ६४लाखाचे बिल थकित असल्याने त्याने पुरवठा थांबवला अन् हा अपघात घडला असं सांगण्यात आले.खरतर हा अपघात नसून संवेदनहीन व कर्तव्यच्युत व्यवस्थेने केलेली हत्या आहे.
सगळ्यात सन्माननीय व्यवसाय म्हणून मान्यता असलेल्या तसेच मानवीय जीवन हेच प्रमुख आधार व उद्देश्य असलेल्या व्यवस्थेत एवढ्या प्रमाणावर बेफिकरपणा अन् मुळ उद्देश्यालाच हरताळ फासला जात असेल तर आपण भौतिक दृष्ट्या प्रगत होत असून माणूस म्हणून मागासलेल्या मनोवृत्तीचे द्योतक आहोत हेच खरे.
चार दिवसांनी ७०वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना केवळ गुलामीच्या जोखडातून मुक्त झालोय पण गुलामी मानसिकतेतून कर्तव्याकडे पाहण्याची वृत्ती मात्र जैसी थे आहे.व्यक्ती तसेच व्यवस्था ह्या दोन्ही एकमेकांना पुरक असतात तेव्हा दोन्हीही नैतिकदृष्ट्या भ्रष्ट असल्यास संपूर्ण समाज पर्यायाने देश विकलांग होतो.अन् असा भौतिकदृष्ट्या स्वतंत्र पण नैतिकदृष्ट्या विकलांग देश मर्यादित प्रगती करतो.इव्हेंट मँनजमेंटच्या जमान्यात अन् कानठाळ्या बसविणाऱ्या आत्ममग्न जल्लोषात करूणेची आर्त हाक ऐकण्यासाठी संवेदनशील मनाची गरज भासते मात्र एका मागून एक धडकत जाणाऱ्या ह्रदयद्रावक घटनांनी समाजमन बोथट झालय.कुणालाही कशाचच काही वाटत नाही दु:खसुद्धा एकाकी पडलय अन् पिडीतांपुरतं मर्यादित झालय.
हे दुश्चक्र थांबवायला हवे.शासन ही कुठली तांत्रिक बाब नसून लोकांनी लोकांच्या माध्यमातून लोकहितासाठी राबविलेली यंत्रणा असते ती व्यवस्थित चालण्यासाठी व्यवस्थेबरोबर संवेदनशील मनाची गरज असते.आपल्या पुर्वजांनी भोगलेल्या पारतंत्र्याचं दु:ख स्वातंत्र्यात जन्मलेल्या पिढीला समजण्यासाठी आपल्या जाणीवा प्रगल्भ पाहिजेत अन्यथा उजळमाथ्याने फडकणाऱ्या तिरंग्याभोवती काळवंडलेल्या स्वातंत्र्याची प्रभावळ तयार होईल अन् त्याचा दीनपणाच अधोरेखित होईल.
नकोत केवळ शुभेच्छांचा सोपस्कार;
नकोत नुसता जिलेबी अन् देशभक्ती गीतांचा भडीमार,
हवा त्यात कर्तव्यदक्षतेचा स्विकार

तेव्हांच बनेल सारे जहाँसे अच्छा हिंदोस्तां हमारा..!
BEWARE BEFORE BECOME GARBAGE

शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

मीबी घडलो तुमीबी घडाना....!!

       
मीबी  घडलो  तुमीबी  घडाना....!


प्रत्येकजण आपापल्या कर्म सिद्धांतानुसार त्या त्या पद्धतीने आयुष्य जगत असतो.कोण का, कसे अन् तसेच का जगतो याला ठोस असे उत्तर नसते पण प्रेरणा देणारीे अनेक कंगोरे असलेली त्याची स्वतंत्र गोष्ट मात्र नक्की असते.
मी मागेवळून पाहतानाही कळतय अन् आठवतय तसं जीवनप्रवाह ज्या ओबडधोबड,कडीकपाऱ्यातून होत गेला तो माझं मलाच कोड्यात टाकत जातो पण प्रत्येक क्षण शृंखलारूपी आयुष्यातील महत्वपूर्ण टप्पा असतो हे मात्र खरं.