प्रतिज्ञेचे पाईक.....!
शाळेतील कळत्या वयापासून पुस्तक पाहत आलोय अन् परिक्षेतील गुणांसाठी व प्रगती-पुस्तकातील शेऱ्यासाठी पहिली तीन पाने सोडून त्यातील पहिला धडा सुरू होतो हेच शिकवलं होतं पण पहिल्या तीन पानापैकी एकावरील राष्ट्रगीत अन् दुसऱ्या वर प्रतिज्ञा बद्दल जगाच्या शाळेत उपयुक्त शैक्षणिक संस्कार काय झाले नाहीत केवळ शाळा सुरू होताना रोजच्या घोकंपट्टीचे सोपस्कार मात्र चालूच राहिले.भारतातील प्रत्येक नागरिकाला खऱ्या अर्थाने भारतीय बनवणाऱ्या प्रतिज्ञेचे महत्व केवळ पुस्तकी उपक्रम उरल्याने अनेकांच्या मनात खालील प्रतिज्ञाच घोळत राहतीय
भारत माझा अन् फक्त माझाच देश आहे।
सारे स्वधर्मीय माझे बांधव आहेत।
माझ्या जातीवर माझे प्रेम आहे।
माझ्या घरातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या फायद्याच्या माणसांचा मान ठेवीन
आणि त्यांच्याशीच सौजन्य दाखवेन ।
माझाच देश आणि माझेच बांधव
यांचीच पाठराखण करण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।
ही विचारसरणी आपल्याच देशात नव्हे तर जगात फोफावत चाललीय अन् ती धोकादायक बाब आहे यासाठीच देशाची प्रतिज्ञा केवळ पुस्तकात छापण्या पेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली गेली पाहिजे तरच भावी काळ विविधतेतून एकतेचा असेल.
जय हिंद !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा