आयता घरोबा अन् राजकारणाचा खेळखंडोबा ...!
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता 'अतिशय गोंधळ वाढवणारी व दूरगामी गंभीर परिणाम करणारी ' असेच तीचे वर्णन योग्य ठरावे. काही वर्षांपूर्वी एखाददुसरा नेता पक्षांतर करत असे तेव्हा त्याचा दुष्परिणाम मर्यादित पण एकंदर राजकीय व्यवस्थेवर न जाणवण्या इतपत असायचा परंतू सध्याच्या सत्ताधारी पक्षाने जो नविनच फंडा आणून ज्या घाऊक पद्धतीने नेत्यांची आयात केली आहे ती पाहता विरोधी पक्ष नावाला सुद्धा शिल्लक राहिल का अशी शंका येते.
सैरभैर झालेले सत्तेत असलेले व नसलेले नेते एकंदर राजकीय दृष्ट्या अपरिपक्वतेचे तसेच सुस्पष्ट विचारधारेचा अभाव असल्याचे द्योतक आहेत. उठता बसता ज्या लोकशाहीच्या नावाने गळा काढत असतात त्या लोकशाहीत विरोधी पक्षच अस्तित्वात नसेल अथवा नाममात्र असेल तर ती केवळ कुडमुडी लोकशाहीच उरेल याचे भान सुज्ञ जणांना असणे आवश्यक आहे.
सत्ताधारी पक्ष साम दाम दंड भेद वापरून विरोधी पक्षाला जेरीस आणून, बघताय काय सामील व्हा नाहीतर बघूनच घेतो अशा अर्विभावात वावरतायत अन् विरोधी पक्षातील नेते इडा पीडा टळो म्हणत कळपात सामील होतायत. सामील होणारे जर खरच प्रामाणिक असतील तर कर नाही त्याला डर कशाला पाहिजे त्यांच्या स्वविकासाच्या व्यवहारातच पाणी मुरत असेल तर वरकरणी जनविकासाची बोंब मारून काय फायदा अन् अशांकडून नैतिक विचारधारेची अपेक्षा ठेवून देखिल काय उपयोग सरते शेवटी उपेक्षाच हाती राहणार.
गळती लागलेली टाकी वापरून प्रवास सुरळीत पार पडेल का? अन् दुरुस्तीचा प्रयत्न करून देखिल न थांबणाऱ्या गळतीमुळे भांबावलेले गळकी टाकी प्रमुख हतबल अन् उद्विग्न होणे स्वाभाविक आहे त्यातूनच मुरब्बी व मुत्सद्दी साहेबांसारख्याचा तोल ढासळत असेल तर परिस्थिती बिकट झाली आहे असे समजावे. परंतू अशा परिस्थितीला सर्वस्वी तेच जबाबदार आहेत कारण केवळ साम दाम दंड भेद वापरून निवडुन येण्याची पात्रता असणारे मग ते गाव गुंड असो, खाणसम्राट असो, शिक्षणसम्राट असो की उपद्रव मुल्य असणारे विशिष्ट जाती-धर्माचे नेते असो अशांची मोळी बांधून सत्तेचा सोपान मिळवण्याची सवय लागलेल्यांना लोककल्याणकारी विचारधारेचा पाया होता का मग विचारधारेशी निष्ठावान सहकाऱ्यांची मजबूत फळी कशी घडणार.
दुसरीकडे स्वतःला पार्टी विथ डिफरन्स समजणारा पक्ष 'उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' हे सोयीस्कर विसरत बकासुरासारखा खात सुटला आहे तेव्हा अशा प्रवृतीला अजिर्णतेचा आजार संभवतो. सतरंज्या उचलून वेगळ्या विचारांसाठी झटणारे व त्या पक्षाचा झेंडा घेतलेले जुने जाणते कार्यकर्ते या मेगा भरतीमुळे अस्वस्थ होणे स्वाभाविक अन् अशा निष्ठावंताना गृहित धरून त्यांचे नेते राजकीय आखाडा तयार करीत असतील अन् बघा कोण कोणते पाटील अन् राजे आमच्या तंबूत येतात अशी शेखी मिरवत टाळ्या घेत असतील तर टाळ्या वाजवणारेच अशांना टाळा मारण्याची भाषा करतील. स्थानिक अन् स्थलांतरित हा वाद जिथे सर्व जगाला भेडसावतोय तो पक्ष पातळीवर पोचायला वेळ लागणार नाही अन् याची सुरुवात देखिल काही ठिकाणी झाली आहे. तेव्हा या पोटफुगीचा धोका स्वपक्षाला देखिल होऊ शकतो. स्थुल व कृश दोन्ही अवस्था शारीरिक दृष्ट्या अयोग्य तसेच संख्याबळाचा टोकाचा फरक हा देखील सुदृढ लोकशाहीला घातकच.
या साऱ्यात सध्या बघ्याची भूमिका घेणारे अन् उद्याचे तथाकथित मतदार राजे कोणता झेंडा घेऊ हाती म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणे कोणता शिक्का मारू माथी विचारत फिरणार आहेत. मग मात्र आयता घरोबा मांडणाऱ्यांनी व तशा प्रकारची खेळी खेळणाऱ्यांनी राजकारणाचा कसा खेळखंडोबा चालविला आहे हे केवळ पाहण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता 'अतिशय गोंधळ वाढवणारी व दूरगामी गंभीर परिणाम करणारी ' असेच तीचे वर्णन योग्य ठरावे. काही वर्षांपूर्वी एखाददुसरा नेता पक्षांतर करत असे तेव्हा त्याचा दुष्परिणाम मर्यादित पण एकंदर राजकीय व्यवस्थेवर न जाणवण्या इतपत असायचा परंतू सध्याच्या सत्ताधारी पक्षाने जो नविनच फंडा आणून ज्या घाऊक पद्धतीने नेत्यांची आयात केली आहे ती पाहता विरोधी पक्ष नावाला सुद्धा शिल्लक राहिल का अशी शंका येते.
सैरभैर झालेले सत्तेत असलेले व नसलेले नेते एकंदर राजकीय दृष्ट्या अपरिपक्वतेचे तसेच सुस्पष्ट विचारधारेचा अभाव असल्याचे द्योतक आहेत. उठता बसता ज्या लोकशाहीच्या नावाने गळा काढत असतात त्या लोकशाहीत विरोधी पक्षच अस्तित्वात नसेल अथवा नाममात्र असेल तर ती केवळ कुडमुडी लोकशाहीच उरेल याचे भान सुज्ञ जणांना असणे आवश्यक आहे.
सत्ताधारी पक्ष साम दाम दंड भेद वापरून विरोधी पक्षाला जेरीस आणून, बघताय काय सामील व्हा नाहीतर बघूनच घेतो अशा अर्विभावात वावरतायत अन् विरोधी पक्षातील नेते इडा पीडा टळो म्हणत कळपात सामील होतायत. सामील होणारे जर खरच प्रामाणिक असतील तर कर नाही त्याला डर कशाला पाहिजे त्यांच्या स्वविकासाच्या व्यवहारातच पाणी मुरत असेल तर वरकरणी जनविकासाची बोंब मारून काय फायदा अन् अशांकडून नैतिक विचारधारेची अपेक्षा ठेवून देखिल काय उपयोग सरते शेवटी उपेक्षाच हाती राहणार.
गळती लागलेली टाकी वापरून प्रवास सुरळीत पार पडेल का? अन् दुरुस्तीचा प्रयत्न करून देखिल न थांबणाऱ्या गळतीमुळे भांबावलेले गळकी टाकी प्रमुख हतबल अन् उद्विग्न होणे स्वाभाविक आहे त्यातूनच मुरब्बी व मुत्सद्दी साहेबांसारख्याचा तोल ढासळत असेल तर परिस्थिती बिकट झाली आहे असे समजावे. परंतू अशा परिस्थितीला सर्वस्वी तेच जबाबदार आहेत कारण केवळ साम दाम दंड भेद वापरून निवडुन येण्याची पात्रता असणारे मग ते गाव गुंड असो, खाणसम्राट असो, शिक्षणसम्राट असो की उपद्रव मुल्य असणारे विशिष्ट जाती-धर्माचे नेते असो अशांची मोळी बांधून सत्तेचा सोपान मिळवण्याची सवय लागलेल्यांना लोककल्याणकारी विचारधारेचा पाया होता का मग विचारधारेशी निष्ठावान सहकाऱ्यांची मजबूत फळी कशी घडणार.
दुसरीकडे स्वतःला पार्टी विथ डिफरन्स समजणारा पक्ष 'उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' हे सोयीस्कर विसरत बकासुरासारखा खात सुटला आहे तेव्हा अशा प्रवृतीला अजिर्णतेचा आजार संभवतो. सतरंज्या उचलून वेगळ्या विचारांसाठी झटणारे व त्या पक्षाचा झेंडा घेतलेले जुने जाणते कार्यकर्ते या मेगा भरतीमुळे अस्वस्थ होणे स्वाभाविक अन् अशा निष्ठावंताना गृहित धरून त्यांचे नेते राजकीय आखाडा तयार करीत असतील अन् बघा कोण कोणते पाटील अन् राजे आमच्या तंबूत येतात अशी शेखी मिरवत टाळ्या घेत असतील तर टाळ्या वाजवणारेच अशांना टाळा मारण्याची भाषा करतील. स्थानिक अन् स्थलांतरित हा वाद जिथे सर्व जगाला भेडसावतोय तो पक्ष पातळीवर पोचायला वेळ लागणार नाही अन् याची सुरुवात देखिल काही ठिकाणी झाली आहे. तेव्हा या पोटफुगीचा धोका स्वपक्षाला देखिल होऊ शकतो. स्थुल व कृश दोन्ही अवस्था शारीरिक दृष्ट्या अयोग्य तसेच संख्याबळाचा टोकाचा फरक हा देखील सुदृढ लोकशाहीला घातकच.
या साऱ्यात सध्या बघ्याची भूमिका घेणारे अन् उद्याचे तथाकथित मतदार राजे कोणता झेंडा घेऊ हाती म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणे कोणता शिक्का मारू माथी विचारत फिरणार आहेत. मग मात्र आयता घरोबा मांडणाऱ्यांनी व तशा प्रकारची खेळी खेळणाऱ्यांनी राजकारणाचा कसा खेळखंडोबा चालविला आहे हे केवळ पाहण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा