काही व्यक्तीं विषयी लिहिताना लेखणी बोथट होते अशीच एक व्यक्ती म्हणजे लता मंगेशकर या नावाने तमाम संगीत विश्वाला खासकरून गायन क्षेत्राला जवळपास नऊ दशकं गारूड घातलयं. आज त्यांचे देहावसान झाले अन् दैवी स्वर अंतर्धान पावले परंतू अजरामर सुर प्रत्येकाच्या मनात कायमच गुंजन करीत राहतील. त्यांच्या गायना बद्दल बोलण्या इतका माझा अभ्यास नाही. त्या क्षेत्रातील दिग्गज जिथे मंत्रमुग्ध होत अबोल होतात तिथे आपण काय बोलणार परंतू मला त्यांची गाणी ऐकताना जाणवणारी गोष्ट म्हणजे इतर सर्व गायकांप्रमाणे त्यांचा चेहरा कधीही डोळ्यासमोर येत नव्हता तो त्या गाण्यात एवढा एकजिनसी होत असे, जसे की पाणी. पाण्याला आपण जीवन म्हणतो तसं ते गाणं जीवनाचा अविभाज्य घटक बनुन जाते अन् हीच त्यांची खासियत होती त्यामुळेच त्यांचे स्वर खऱ्या अर्थाने दैवी होते. हा स्वर कुणाच्या ना कुणाच्या रुपाने पुन्हा जन्माला यावा अन् सर्वांना मनस्वी समाधान मिळावे हीच भावना व्यक्त करीत त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा