आज भारतीय नौदल आणखी समृद्ध करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आज देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत (INS Vikrant) भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे अन् नक्कीच भारताची सामरिक ताकद अनेक पटींनी वाढली आहे. एक भारतीय म्हणून मला सार्थ अभिमान आहेच पण एक महाराष्ट्रीयन म्हणून मला आज विशेष आनंद होत आहे कारण भारतीय नौदलाच्या ध्वजावर सेंट जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होतं. हे हटवून आता झेंड्यावर नांगर असणारं भारतीय नौदलाचं चिन्ह आहे. त्यावर सत्यमेव जयते आणि श नो वरुण: हे ब्रीद लिहिलेलं आहे. याचा अर्थ 'जलदेवता वरुण आम्हांला आशीर्वाद देवो' असा आहे.
भारताचे पहिले आरमार उभारणाऱ्या शिवरायांच्या राजमुद्रेपासून नौदलाच्या नव्या झेंड्यासाठी प्रेरणा घेतली आहे तसेच हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे.
जय हिंद जय महाराष्ट्र
.jpeg)
.jpeg)
.jpeg)