राजे पुन्हा जन्माला यायचा नाय तर तो विचार पुन्हा जन्माला घालण्याचा विषय हाय.
शिवजयंतीला नुसत्या घोषणा अन् जयजयकार करण्याचा नाय
तर जय भवानी म्हंटल्यावर आपसूकच जय शिवाजीन उर भरण्याचा विषय हाय
शिवाजी हा केवळ मराठी अस्मितेचाच नाय तर स्वराज्य घडवायचा विषय हाय
म्हणुनच म्हणतो मित्रानो शिवाजी फक्त बोलण्याचाच नाय तर करून दाखवायचा विषय हाय
शिवराय नुसता मिरवायचा नाय तर गिरवायचा विषय हाय
विषय एकच रयतेचा राजा राजा शिवछत्रपती....
