लढेन मी शस्त्रानेच, पण शस्त्रविवेक न सोडता
मोडेन मी कायदा ही, न्यायाच्या प्रतिष्ठेसाठी
हिंसा घडेल, हिंस्त्रहिंसकाच्या नाशासाठी
आम्ही होऊ धर्मवेडे, धर्मवेड्यांच्या संहारासाठी
होऊ थोडे असंस्कृत, संस्कृतीच्या रक्षणासाठी
जे या मातीत राहतात, त्यांनी या मातीवर प्रेम करायला शिकायला हवं
कारण
ही मातीच तुम्हाला अन्न देते
तुमच्या श्वासांना प्राणवायू देते
आपल्या लेकरांनी चालवलेल्या नांगराच्या फाळांनी, ती आपला उर चिरुन घेते
आणि परत देते पेरलेल्या तरेख दाण्यागणिक हजार दाणे
म्हणूनच
तिने न मागता तुम्ही तीला द्यायला हवी
निष्ठा
ज्यांना राष्ट्रनिष्ठा मान्य नसेल त्यांनी हे राष्ट्र सोडायला हवं....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा