विचार करण्याची उपजत देणगी निसर्गाने थोड्याफार प्रमाणात सर्व प्राणीमात्रांना दिली आहे मात्र ते व्यक्त करण्याचे कौशल्य फक्त मानवालाच लाभले आहे त्यातल्या त्यात संवेदनशील व्यक्तींना अधिक. त्याचा सदुपयोग करण्यासाठी हा लेखनप्रपंच...
शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७
शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७
मंगळवार, ३१ जानेवारी, २०१७
विलेक्षण....!
सध्या राजकारण म्हणज दे टाळी जमलं नाहितर टाळाटाळी मग घसा बसोसतर एकमेकांच्या करा टवाळी अन् वाजवा टाळी एवढंच उरलय.
निवडणूक म्हणजे थापांचा पूर अन् पैशाचा धुर.
विकासाच्या नावानं पाडून भूल भावनांच्या बाजाराला मात्र मतांचा कौल.
आज ह्यों उद्या त्यों कितीही फिरवली भाकरी तरी परिस्थिती ज्यों की त्यों.
ईलेक्शन फिवरमधे टैक्स फ्री एन्टरटेनमेंटचा शो, उतरला फिवर की धक्क्याची लोकल अन् खड्याच्या रस्त्यासाठी ठेकेदारांची टक्केवारीची शक्कल.
यादीत असला की कामा पुरता राजा
एकदाका बोटाला लागली शाई मग कसलं मत अन् कसली किंमत श्रद्धा सबुरी मेरा साई.
संदिप महामुनी.
निवडणूक म्हणजे थापांचा पूर अन् पैशाचा धुर.
विकासाच्या नावानं पाडून भूल भावनांच्या बाजाराला मात्र मतांचा कौल.
आज ह्यों उद्या त्यों कितीही फिरवली भाकरी तरी परिस्थिती ज्यों की त्यों.
ईलेक्शन फिवरमधे टैक्स फ्री एन्टरटेनमेंटचा शो, उतरला फिवर की धक्क्याची लोकल अन् खड्याच्या रस्त्यासाठी ठेकेदारांची टक्केवारीची शक्कल.
यादीत असला की कामा पुरता राजा
एकदाका बोटाला लागली शाई मग कसलं मत अन् कसली किंमत श्रद्धा सबुरी मेरा साई.
संदिप महामुनी.
सोमवार, २३ जानेवारी, २०१७
आभासाचे प्रतिक......!
प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंधीला औरंगाबाद येथे नुकतीच एक घटना घडली ती म्हणजे स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या त्रिसदस्यीय समितीतील तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.कारण त्यांनी पालिका आयुक्तांकडे औरंगाबादचे अव्वल शहरांच्या यादीत नाव टाकण्यासाठी पाच लाखांची लाच मागीतली.विशेष म्हणजे या पाहणी पथकातील सदस्यांनी या कामानिमित्ताच्या मुक्कामात २५/३०हजाराची दारू ढोसली असे देखिल निदर्शनास आले आहे.सार्वजनिक स्वच्छतेबाबत कागदोपत्री जागरूक असणारे असले (दारू)अमलदार म्हणजे माकडाच्या हातात कोलीतच.नंतर फार फार तर चौकशी समितीचा फार्स करीत वेळकाढूपणा होईल मग ते प्रकरण प्रोसिडिंगच्या फेऱ्यात अन् कारवाई गुलदस्त्यात.
भारतीय राज्यघटना जगात अनेक बाबतीत उत्कृष्ट राज्यघटना तसेच जगातील सर्वोत्कृष्ट मुल्यांचा परिपाक असणारी मुलभूत मुल्ये असून देखिल सध्या सर्व स्तरांवर एखाद्या मुलभूत विकासापेक्षा त्याच्या दृश्य स्वरूपातील प्रतिकात्मक सोपस्कारावर अधिक लक्ष केंद्रित करून त्याचाच प्रचार व प्रसार करण्यावर भर दिला जातो मग ती सरकारी धोरणे असो की जगण्याची रीतभात.त्यासाठी मग माध्यमं छापील ते ईलेक्ट्रानिक कोणतेही असो.
सरकारी दवाखान्यात एखादा अनोळखी गंभीर रूग्ण असो की मृतदेह त्यांचा वेळवर व योग्य उपचार असो की अंतिम सोपस्कार ज्या बेफिकिरपणे केला जातो ते पाहता मानवी संवेदना कितीही बोथट असल्या तरी मोबाईल ची रिंगटोन मात्र भक्तिमय ठेवलेली असते.भिंतीवर 'रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' असे छान प्रभावी वाक्य लिहून ठेवायचे सरकारी नियमानुसार कर्मचाऱ्यांचा सर्व कोटा भरला अन् सोशल वर्कर नावाने पदं भरली की झाले भले त्याने नेमून दिलेली सेवा मन लावून न का करो पगार व अन्य सोयीसुविधांचा मेवा नेमाने घेण्याबाबत मात्र ते आग्रही असतात रुग्ण मात्र अनास्थेचे बळीच ठरतात.दुसरीकडे सुरक्षा सप्ताहाचे निमित्त साधून हप्ता गोळा करण्यात मग्न असणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना वाहतूक शिस्तीपेक्षा नियमांच्या अज्ञान व उल्लंघनातच फायदा दिसतो.एकिकडे अशी वेगवेगळ्या सरकारी खात्यातील वेगवेगळ्या तऱ्हा अन् दुसरीकडे निवडुन आलेले लोकप्रतिनिधी त्या त्या सभागृहात लोकांच्या हितासाठी चर्चा करायची सोडून अर्धे अधिवेशन आरडाओरडा करण्यातच घालवतात अन् स्वतःचे पगार,भत्ते न चर्चा करता बहुमताने वाढवतात.एकिकडे संसदेला लोकशाहीचे मंदिर म्हणत पायरीवर डोके ठेवणारे स्वतःच्या निर्णयाचे उत्तरदायित्व स्विकारत संविधानात्मक मत मांडून चर्चा करण्यापेक्षा व्टिटरला प्राधान्य देतात.चरख्यावर सुत काततानाचा फोटो टाकून एखाद्याची अहिंसावादी प्रतिमा पुसताही येत नाही अन् अंगिकारताही येत नाही.तसेच केवळ 'हलवा सेरेमनी' करून देशाची आर्थिक घडी व्यवस्थित करणारा अर्थसंकल्प गोड होऊ शकत नाही तर त्यासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय निरपेक्ष अन् कठोरपणे तसेच दुरदृष्टि ठेवून घेतले पाहिजेत.
अशा सगळ्या वरवरचा आदर्शवाद मिरवण्यातच समाधान मानणाऱ्या व शोधणाऱ्या मानसिकतेचे आपण सर्व बळी ठरतो आहोत अन् केवळ आदर्शवाद मुल्यांचा प्रतिकात्मक स्विकार करून मुलभूत बदलाचा आभास निर्माण करतो आहोत आता ही आभासाची प्रतिकेच आपले जगणं व्यापून टाकतायेत तेव्हा जगणं प्रतिकात्मक होण्या आधी सावध होऊया..!
संदिप महामुनी
९६३७१३०२०६
शनिवार, १४ जानेवारी, २०१७
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
सुर्याचा मकर राशीत प्रवेश(संक्रमण) होत त्याचे उत्तरायण सुरू होते अन् यालाच आपण मकरसंक्रांत म्हणत ती साजरी करतो.थोडक्यात काय एका टप्प्याकडून दुसऱ्या टप्प्याकडे प्रवास करताना आधी काय वाईट घडलं असेल तर ते सोडून या निमित्ताने चांगली सुरवात करायला स्वतःला व दुसऱ्याला संधी देणे इतकचं अन् ती गोड असेल तर तिळात गुळ...
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
रविवार, १ जानेवारी, २०१७
मनमौजी जगायचे....!
मनमौजी जगायचे....!
आज नेहमीप्रमाणे चहा पित बसलो होतो, सौ जेवण बनवण्यात व्यस्त होत्या अन् आमचे लाडके चिरंजीव राजवर्धन टिव्ही पाहण्यात गुंग होते अर्थात कार्टूनच चालू होते माझ्या मते आकार उच्चार बदलले तरी कार्टून्स गैर नाहीत कारण आपल्या लहानपणी सुद्धा ते आपल्याला खुणावत होतेच पण मोठेपण येता येता वास्तवात त्या प्रतिमा धुसर होत गेल्या इतकचं.या वास्तवाचे अचुक भान असणाऱ्या तमाम आयांचे प्रतिनिधित्व करत आमच्या अर्धांगिनी स्वयंपाकघरातूनच गरजल्या "अरे काय करतोयस गा** स्कॉलरशिपला बसलायस लक्षात आहे का विसरलास..." मग नेहमीची ठरलेली उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक वाटणारी काय करावे काय करू नये या सदरात मोडणारी सु भाषीतील घोकंपट्टी करून माझ्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी कटाक्ष टाकत अहो बघतायना काही तरी सांगा त्याला अशी सुचना वजा आदेश दिला मी पण वडिलकीचे कर्तव्यरूपी सोपस्कार पार पाडणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत अरे काय करायचय,अवघड आहे पुढे म्हणत काही आदर्श तथाकथित यशस्वी लोकांची ऐकून ऐकून गुळगूळीत झालेली उदाहरण देत छातीत भरलेली हवा मोकळी केली.तुला नेमके काय करायचेय ह्या उत्तराची अपेक्षा न ठेवता विचारलेल्या प्रश्नाने ठरलेला शेवट करावा हा प्रघात पाळत चहाचा घुटका घेतला अन् चिरंजीवाच्या आकस्मिक उत्तराने एकदम ठसकाच लागला.उत्तरच तसे होते " मनमौजी जगायचे".१२ वर्षीय मुलाचे उद्गार ऐकून मी अन् सौ दोघेही स्तब्ध होऊन त्याचाकडे पाहत राहिलो.थोड्याश्या अंतरालाने मला त्याच्या उस्फूर्त व मनस्वी उत्तराने समाधान वाटले कारण आपल्यातील प्रत्येकालाच असे जगायची सुप्त महत्वाकांक्षा असते अन् ती कधीतरी नक्कीच पुर्ण होईल या आशेवर आपण आपल्या आयुष्याचा सारीपाट मांडत असतो.
खरतर मनमौजी जगणे म्हणजे मनाला वाटेल तसे बंधन नसलेले स्वैर असे आपणास वाटते पण प्रत्यक्षात कुठल्याही कामात मन रमणे नाहीतर रमवणे म्हणजे मनमौजी कारण स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचे भान अन् मनाला शिस्त असेल तसेच कल्पना व वास्तव यातील तफावत ओळखून ती स्विकारण्याची मानसिकता असेल तरच आपण कोणतेही काम आनंदाने करू शकू व तीच त्यातील मौज आहे.मनमौजीपन हे काय साध्य नव्हे तर तो आयुष्याकडे पाहण्याचा व जगण्याचा दृष्टिकोन होय.आपण एक स्वतंत्र व्यक्ती असलो तरी या निसर्गाचा व समाजाचा घटक आहोत तसेच त्याचे नियंत्रण एकतर्फी नाही हे विसरून चालणार नाही.असो राजवर्धनच्या उत्तराने पुन्हा एकदा उजळणी झाली अन् हो आजपासून नव्या वर्षात २०१७ मधे पदार्पण करीत आहोतच तेव्हा त्याला तो मनमौजी दृष्टिकोन लाभो ही सदिच्छा व्यक्त करीत आपणही मनमौजीपणे जगुया त्यासाठी तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा...!
संदिप महामुनी
९६३७१३०२०६
शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६
बिन पैशाचा तमाशा......!
बिन पैशाचा तमाशा......!
अर्थ निश्चलीकरणाच्या निर्णयाने देश चांगलाच ढवळून निघाला अन् आठवड्याभरात जुने ५००/१००० रूपयाचे चलन जमा करण्यासाठीची मुदत देखिल संपेल तेव्हा निणर्याला ५० दिवस पुर्ण झाल्या प्रित्यर्थ त्याचा नेमक्या रद्द झालेल्या अन् जमा झालेल्या चलनाच्या आकडेवारीचा तसेच काळ्या पैशाचा सरकारी हिशोबासहित सरकारी निर्णयाचा लेखाजोखा यथावकाश सुवर्णक्षणी यथार्थपणे मांडला जाईल आपण त्याचे नेहमीप्रमाणे मुक साक्षीदार होऊचं.
या निर्णयानंतर तब्बल १२५ वेळा नियम बदलले त्यामुळे सामान्य जनते बरोबरच सरकार सुद्धा संभ्रमित होते तेव्हा अर्थशास्त्र हा विषय बहुतांशी पर्यायी असल्याने त्याच्या दुर्बोधते बद्दल वावडे असणे क्रमप्राप्तच आले तेव्हा डोक्याला जास्त ताण न देता आलिया भोगासी असावे सादर हा संस्कार गिरवणे उत्तम म्हणत देशभक्तीच्या वीररसाने स्वतःची करमणूक करावी एवढाच पर्याय आपल्या कडे उरतो.या निर्णयाने सोशल मीडिया वरील दोन्ही कडच्या प्रतिभाशाली वर्गाला संधी मिळाली अन् त्यांनी त्याचे सोने केले (आनंदाची बाब म्हणजे या सोन्यावर मात्र कोणताही कर अथवा कोणाची नजर नाही असो) काहींनी हे सोने मनमोहनी पद्धतीने येथेच्छ लुटले मग व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला म्हणून काही फरक पडत नाही.तसही व्यवस्थेने लोकांना गृहित धरलेले असते अन् सरकारने व्यवस्थेला.
या सगळ्या घडामोडीमधे अनेक मनोरंजक अन् आपल्या सारख्या पामरांना अचंभित करणाऱ्या घटना घडल्या.एकिकडे स्वतःच्या २०००रूपयांसाठी ३-४ तास रांगेत उभारून देशप्रेम व्यक्त करणारे तसेच स्वत:चे पांढरे केस काळे करायला सुद्धा वैतागणारे आपण अन् दुसरीकडे बिनदिक्कत १००/२०० कोटी काळ्याचे चुटकीसरशी पांढरे करणारे,१०-१० कोटी नविन चलनात लॉकर मधे ठेवणारे तसेच तिजोरीच्या चाव्या कनवटीला बांधून जमादारकीचा सौदा करणारे आधुनिक मनसबदार पाहिले की काही लोकं जास्तच समान असतात हे उमगते.एका बहाद्दराने वर्तमानपत्रात जुन्या नोटा बदलून देण्याची रीतसर जहिरातच दिली अन् ती वर्तमानपत्राने बिनदिक्कत छापली देखील ! त्याला वाटलं छोटी जहिरात असल्यामुळे नेहमीप्रमाणे जो गरजवंत असेल तोच बघेल नाहीतरी मसाज, लैगिंक समस्या निवारण,ज्योतिष सल्ला अश्या जहिरातींशी थोडाच संपादकाचा अथवा सरकारी खात्याचा दुरान्वये संबध असतो या त्याच्या प्रामाणिक भाबड्या आशावादाला सलामच ठोकला पाहिजे.
८ नोहेंबरनंतर बँके व्यतिरिक्त रद्दी झालेल्या नोटा राजकीय पक्षात देणगीरूपी गुंतवणूक करण्याची मुभा मिळाल्यामुळे किमानपक्षी काही ठेकेदाराचं तरी कोटकल्याण झाले तसेच २०००० रूपयापर्यंतचा व्यवहार गुप्त ठेवण्याचा व त्या पटीतच व्यवहार करण्याची मुभा असल्याने शिवाय जनता जर्नाधनाच्या सेवेचे पवित्र कार्य करण्याचे व्रत घेतले असल्याकारणाने अन्य कशाही प्रकारचे देशप्रेम व्यक्त करण्याची आवश्यकता नसल्याने त्यांना करमुक्त केलेले आहेच तेव्हा असा महत्वपूर्ण निर्णय सर्व पक्षांच्या पथ्यावर पडला त्यामुळे सर्वांनी आळी मिळी गुपचिळीचे धोरण कोणताच आक्रोश न करता स्विकारलेले आहे.
काळा पैसा संपवणे,नकली नोटांचे उच्चाटन,आतंकवादाची आर्थिक रसद तोडणे हा व्यापक उद्देश ठेवून घेतलेला निर्णय किती सफल ठरला ते येणारा काळ ठरवेलच परंतू कँशलेसच्या चकचकीत रँपरमधे तो सादर करून जर भूल पाडली जात असेल तर घडलेेला या बिन पैशाचा तमाशामुळे झालेले तथाकथित मनोरंजन नसून अंगावर येणारे बोचरे वास्तव असेल.कुठलाही भुकंप न होता काहीतरी चांगले घडो या आशावादावर वाट पाहत आहोतच.
संदिप महामुनी
९६३७१३०२०६
सोमवार, ५ डिसेंबर, २०१६
केल्याने देशप्रेम...!
सुप्रीमकोर्टाने थिएटर्सना राष्ट्रगीत सक्तीचे केले एकून वाईट वाटलं हो खरच वाईटच वाटलं
.
.
.
.
.
.
कारण जी गोष्ट उस्फुर्त असायला हवी त्याची सक्ती करावी लागणे हे आपल्या देशप्रेमाचे बोचरे वास्तव असून आपल्याला आपल्या जडणघडणा विषयी आत्मपरीक्षण करावेच लागेल अन्यथा प्रेरणादायक भावनेपेक्षा शिस्तीच्या नियमातील तांत्रिकतेतच समाधान शोधत राहू..!
#जयहिन्द!
Nationalism is infantile disease.It is measles of mankind-Albert Einstein
.
.
.
.
.
.
कारण जी गोष्ट उस्फुर्त असायला हवी त्याची सक्ती करावी लागणे हे आपल्या देशप्रेमाचे बोचरे वास्तव असून आपल्याला आपल्या जडणघडणा विषयी आत्मपरीक्षण करावेच लागेल अन्यथा प्रेरणादायक भावनेपेक्षा शिस्तीच्या नियमातील तांत्रिकतेतच समाधान शोधत राहू..!
#जयहिन्द!
Nationalism is infantile disease.It is measles of mankind-Albert Einstein
मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६
अर्थ निश्चलाच्या मनी....!
अर्थ निश्चलाच्या मनी....!
अचानक निघालेल्या सत्ताधारी फतव्याने मानवीय व्यवहार स्वातंत्र्य किती क्षणभंगुर अन् तकलादू असू शकते तसेच क्षणात होत्या चे नव्हते अन् अर्थाचा कसा अनर्थ ओढावतो ते नुकत्याच सरकारने घेतलेल्या ५००/१००० च्या नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनांना अनुभवावा लागत आहे.
गैरव्यवहार,काळा पैशावर अंकुश,सुरक्षितता किंवा तत्सम अपरीहार्यता, धाडसी अथवा आतबट्ट्याचा निर्णय या चुक की बरोबर वादाला माझ्या मते काहीही मोल नाही कारण बहुतांश मानसिकतेनुसार जबाबदारीच घोंगडं दुसऱ्याच्या गळ्यात टाकून स्वैर जगण्याला प्राधान्य देणाऱ्यांना त्याच घोंगडयांवर बसणाऱ्याचे किर्तन ऐकावे लागणार मग सोयीस्कर हितासाठी लोकशाहीच्या नावाने गळे काढून काय उपयोग? एखाद्या कागदाला असलेले मोल दुसऱ्या क्षणी मातीमोल होत असेल तर या जास्तीत जास्त संग्रह करून स्वतःचे मोल वाढवण्यासाठी धडपडणाऱ्या वृत्तीला ती एक चपराकच आहे. प्रत्येक श्वासानंतर येणाऱ्या श्वासाची जिथे अनिश्चितता असते तिथे भ्रमात वावरणारे व त्यातच रमणारे आपण सत्यापासून फारकत घेत सत्यमेव जयते चा आदर्श नारा देत जगत असतो.या आपल्या दुटप्पी वागण्यामुळे आपण तथाकथित निश्चिंतीसाठी अविरत धावपळ करीत सोयीस्कर व्यवस्थेचा स्विकार करतो अन् ही व्यवस्था कितीही बेकायदेशीर असली तरी एकदा का ती अंगवळणी पडली की ती बदलण्याची भाषा देखिल सहन होत नाही अन् त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.
भारतीय साहित्यात नैतिकता व त्यातून निर्माण होणारी नितीमत्ता याचे उदात्तीकरण हे व्यक्तिकेंद्रित केले गेले आहे त्याचेच प्रतिबिंब चित्रपटात पडलेले आढळते.म्हणूनच चित्रपट अधिक तर नायकप्रधान फार फार तर बलात्कार पिडितेचा बदला घेणाऱ्या नायिकाप्रधान असतात अन् हे सर्व पडद्यावरील आदर्श हिरो-हिरोइन पदोपदी नाडणाऱ्या जुलमी,भ्रष्ट व्यवस्थेशी तोंडी लावण्या करिता रोमान्स करीत संघर्ष करून सर्वमान्य व्हिलनला खल्लास करीत शेवट गोड करतात मग प्रेक्षक ही समाधानानी घरी जातात अन् हिरो-हिरोइन प्रसिध्दी मिळवित आपापली घरे भरतात.इथे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला संपवत व्यक्तिगत न्यायनिवाडा करते परंतू व्यवस्थेचं काय तीचे उत्तरदायित्व कुणाचे का केवळ हिरो-हिरोइन,व्हिलन बदलत राहणारे चित्रपट पाहत बोचेऱ्या वास्तवापासून पळ काढत समाधान मानायचे.
व्यक्ती पेक्षा व्यवस्था श्रेष्ठ असेल तरच खऱ्या अर्थाने स्थिरता व समानता लाभू शकते.सर्व संकल्पना आपापल्या सोयीनुसार गृहित धरत जगताना आयुष्यात अनेक तरंग उमटले तर निभावून नेता येते परंतू जर का लाटा निर्माण झाल्यास नुकसानीची शक्यताच अधिक तेव्हा संकल्पना तपासून त्या तटस्थपणे आत्मसात करता आल्या तर अचानक उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीत अगदी अर्थिक आणिबाणीत देखिल अर्थ निश्चल झाले तरी मनाने निश्चल राहता येईल.
अर्थ मुलोही धर्मा ।
संदिप महामुनी
9637130206
अचानक निघालेल्या सत्ताधारी फतव्याने मानवीय व्यवहार स्वातंत्र्य किती क्षणभंगुर अन् तकलादू असू शकते तसेच क्षणात होत्या चे नव्हते अन् अर्थाचा कसा अनर्थ ओढावतो ते नुकत्याच सरकारने घेतलेल्या ५००/१००० च्या नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनांना अनुभवावा लागत आहे.
गैरव्यवहार,काळा पैशावर अंकुश,सुरक्षितता किंवा तत्सम अपरीहार्यता, धाडसी अथवा आतबट्ट्याचा निर्णय या चुक की बरोबर वादाला माझ्या मते काहीही मोल नाही कारण बहुतांश मानसिकतेनुसार जबाबदारीच घोंगडं दुसऱ्याच्या गळ्यात टाकून स्वैर जगण्याला प्राधान्य देणाऱ्यांना त्याच घोंगडयांवर बसणाऱ्याचे किर्तन ऐकावे लागणार मग सोयीस्कर हितासाठी लोकशाहीच्या नावाने गळे काढून काय उपयोग? एखाद्या कागदाला असलेले मोल दुसऱ्या क्षणी मातीमोल होत असेल तर या जास्तीत जास्त संग्रह करून स्वतःचे मोल वाढवण्यासाठी धडपडणाऱ्या वृत्तीला ती एक चपराकच आहे. प्रत्येक श्वासानंतर येणाऱ्या श्वासाची जिथे अनिश्चितता असते तिथे भ्रमात वावरणारे व त्यातच रमणारे आपण सत्यापासून फारकत घेत सत्यमेव जयते चा आदर्श नारा देत जगत असतो.या आपल्या दुटप्पी वागण्यामुळे आपण तथाकथित निश्चिंतीसाठी अविरत धावपळ करीत सोयीस्कर व्यवस्थेचा स्विकार करतो अन् ही व्यवस्था कितीही बेकायदेशीर असली तरी एकदा का ती अंगवळणी पडली की ती बदलण्याची भाषा देखिल सहन होत नाही अन् त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.
भारतीय साहित्यात नैतिकता व त्यातून निर्माण होणारी नितीमत्ता याचे उदात्तीकरण हे व्यक्तिकेंद्रित केले गेले आहे त्याचेच प्रतिबिंब चित्रपटात पडलेले आढळते.म्हणूनच चित्रपट अधिक तर नायकप्रधान फार फार तर बलात्कार पिडितेचा बदला घेणाऱ्या नायिकाप्रधान असतात अन् हे सर्व पडद्यावरील आदर्श हिरो-हिरोइन पदोपदी नाडणाऱ्या जुलमी,भ्रष्ट व्यवस्थेशी तोंडी लावण्या करिता रोमान्स करीत संघर्ष करून सर्वमान्य व्हिलनला खल्लास करीत शेवट गोड करतात मग प्रेक्षक ही समाधानानी घरी जातात अन् हिरो-हिरोइन प्रसिध्दी मिळवित आपापली घरे भरतात.इथे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला संपवत व्यक्तिगत न्यायनिवाडा करते परंतू व्यवस्थेचं काय तीचे उत्तरदायित्व कुणाचे का केवळ हिरो-हिरोइन,व्हिलन बदलत राहणारे चित्रपट पाहत बोचेऱ्या वास्तवापासून पळ काढत समाधान मानायचे.
व्यक्ती पेक्षा व्यवस्था श्रेष्ठ असेल तरच खऱ्या अर्थाने स्थिरता व समानता लाभू शकते.सर्व संकल्पना आपापल्या सोयीनुसार गृहित धरत जगताना आयुष्यात अनेक तरंग उमटले तर निभावून नेता येते परंतू जर का लाटा निर्माण झाल्यास नुकसानीची शक्यताच अधिक तेव्हा संकल्पना तपासून त्या तटस्थपणे आत्मसात करता आल्या तर अचानक उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीत अगदी अर्थिक आणिबाणीत देखिल अर्थ निश्चल झाले तरी मनाने निश्चल राहता येईल.
अर्थ मुलोही धर्मा ।
संदिप महामुनी
9637130206
गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६
मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६
रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६
रविवार, २ ऑक्टोबर, २०१६
मोर्चात्सवाचे बळी.....!
मोर्चात्सवाचे बळी.....!
कोपर्डीच्या निमित्ताने निघणारे मराठा समाजाचे व्यापक मोर्चे मराठा समाजातील खदखद बाहेर पडत आहे याचेच द्योतक ठरते आहे.
पण अत्याचाराला जातीय चौकटीत बसवून आरक्षण व अँट्रॉसिटी मुद्यावर वातावरण निर्मिती केल्यामुळे तसेच आरक्षण हा न्यायप्रविष्ठ तर अँट्रॉसिटी हा केन्द्रीय व घटनात्मक विषय असल्यामुळे नेमके त्याचे फलित काय हा सद्य स्थितीला तरी अनुत्तरित प्रश्न आहे.मुक मोर्चातील शिस्त व स्वच्छता याचे नियोजन जरी कौतुकास्पद असले तरी ही वादळा पुर्वीची शांतता आहे यातून दुर्दैवी असा संख्याबळाचे दबाव तंत्र हाच घटक ठळकपणे अधोरेखित होतो आहे अन् माणूस अनुकरण प्रिय असल्यामुळे याची लागण सर्व समाजाला झाल्याशिवाय राहणार नाही.प्रत्येकजण कोणत्याही समस्येचे मुळ जमवा गर्दी अन् खेचा वर्दी अशाप्रकारच्या मार्गानेच जाईल.त्यातून प्रत्येक घटक असुरक्षित भावनेतून एकत्र येईल अन् त्यातून जातीय तेढ व एकमेका विषयी द्वेषच निर्माण होण्यास मदत मिळेल सरतेशेवटी जिसकी लाठी उसकी भैंस हाच फॉर्म्युला उपयुक्त ठरेल तो वापरताना मात्र एक मराठा=एक लाख या गणितानुसार एक माळी,एक महार, एक मुस्लिम,एक...,अनेक जाती जमाती बद्दल अनिभिज्ञ असल्यामुळे असंख्य एक म्हणजे किती हे ठरायचे आहे तसेच ते कोणी व कसे ठरवणार हे देखिल माहित नसल्यामुळे नेमके संख्याबळ समजू शकत नाही तेव्हा एकंदरीतच भारतीय लोकसंख्या नेमकी किती पटीने वाढणार आहे हे देखिल कळणार नाही तेव्हा या फॉर्म्युल्याने नेमके कोणाचे गणित सुटणार हे काळच ठरवेल मात्र ते लोकशाहीला व पर्यायाने भारत देशाच्या एकसंधतेला धोकादायक आहे एवढे नक्की.
वेडात दौडले सात हा इतिहासात शिवाजी महाराजांना पडलेला प्रश्न सद्यस्थितीला वेडात दौडणाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात गेली तरी जैसे थे असेल तर आपण शिक्षित झालो तरी शैक्षणिक दृष्ट्या प्रगल्भ झालो नाही हेच खरे.देशात इतरत्रही जाट, पटेल आरक्षणासाठी आंदोलन होत आहेत हे ही त्याचेच द्योतक आहे.परंतू देश रक्षणासाठी कार्यरत असलेले आपले सैन्य या विभागणीतून जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे तिथे केवळ भारतीय अन् तमाम भारतीयांचे रक्षण करण्याची दुर्दम्य ईच्छाशक्ती असणारेच जाऊ शकतात.ते लढताना महाराष्ट्रीयन, बिहारी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय... वैगरे अथवा हिंदू, मुस्लिम, शिख... मराठा, महार, ब्राह्मण...म्हणून लढत नाहीत.तेव्हा एकजुट असावी पण केवळ उत्साह व उत्सवी मानसिकतेने नव्हे तर समतोल विचाराने अन् राष्ट्रीय एकात्मतेसाठी व सर्वसमावेशक विकासासाठी एवढीच माफक अपेक्षा एक मुक साक्षीदार नागरिक म्हणून वाटते.
जय हिंद ।
कोपर्डीच्या निमित्ताने निघणारे मराठा समाजाचे व्यापक मोर्चे मराठा समाजातील खदखद बाहेर पडत आहे याचेच द्योतक ठरते आहे.
पण अत्याचाराला जातीय चौकटीत बसवून आरक्षण व अँट्रॉसिटी मुद्यावर वातावरण निर्मिती केल्यामुळे तसेच आरक्षण हा न्यायप्रविष्ठ तर अँट्रॉसिटी हा केन्द्रीय व घटनात्मक विषय असल्यामुळे नेमके त्याचे फलित काय हा सद्य स्थितीला तरी अनुत्तरित प्रश्न आहे.मुक मोर्चातील शिस्त व स्वच्छता याचे नियोजन जरी कौतुकास्पद असले तरी ही वादळा पुर्वीची शांतता आहे यातून दुर्दैवी असा संख्याबळाचे दबाव तंत्र हाच घटक ठळकपणे अधोरेखित होतो आहे अन् माणूस अनुकरण प्रिय असल्यामुळे याची लागण सर्व समाजाला झाल्याशिवाय राहणार नाही.प्रत्येकजण कोणत्याही समस्येचे मुळ जमवा गर्दी अन् खेचा वर्दी अशाप्रकारच्या मार्गानेच जाईल.त्यातून प्रत्येक घटक असुरक्षित भावनेतून एकत्र येईल अन् त्यातून जातीय तेढ व एकमेका विषयी द्वेषच निर्माण होण्यास मदत मिळेल सरतेशेवटी जिसकी लाठी उसकी भैंस हाच फॉर्म्युला उपयुक्त ठरेल तो वापरताना मात्र एक मराठा=एक लाख या गणितानुसार एक माळी,एक महार, एक मुस्लिम,एक...,अनेक जाती जमाती बद्दल अनिभिज्ञ असल्यामुळे असंख्य एक म्हणजे किती हे ठरायचे आहे तसेच ते कोणी व कसे ठरवणार हे देखिल माहित नसल्यामुळे नेमके संख्याबळ समजू शकत नाही तेव्हा एकंदरीतच भारतीय लोकसंख्या नेमकी किती पटीने वाढणार आहे हे देखिल कळणार नाही तेव्हा या फॉर्म्युल्याने नेमके कोणाचे गणित सुटणार हे काळच ठरवेल मात्र ते लोकशाहीला व पर्यायाने भारत देशाच्या एकसंधतेला धोकादायक आहे एवढे नक्की.
वेडात दौडले सात हा इतिहासात शिवाजी महाराजांना पडलेला प्रश्न सद्यस्थितीला वेडात दौडणाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात गेली तरी जैसे थे असेल तर आपण शिक्षित झालो तरी शैक्षणिक दृष्ट्या प्रगल्भ झालो नाही हेच खरे.देशात इतरत्रही जाट, पटेल आरक्षणासाठी आंदोलन होत आहेत हे ही त्याचेच द्योतक आहे.परंतू देश रक्षणासाठी कार्यरत असलेले आपले सैन्य या विभागणीतून जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे तिथे केवळ भारतीय अन् तमाम भारतीयांचे रक्षण करण्याची दुर्दम्य ईच्छाशक्ती असणारेच जाऊ शकतात.ते लढताना महाराष्ट्रीयन, बिहारी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय... वैगरे अथवा हिंदू, मुस्लिम, शिख... मराठा, महार, ब्राह्मण...म्हणून लढत नाहीत.तेव्हा एकजुट असावी पण केवळ उत्साह व उत्सवी मानसिकतेने नव्हे तर समतोल विचाराने अन् राष्ट्रीय एकात्मतेसाठी व सर्वसमावेशक विकासासाठी एवढीच माफक अपेक्षा एक मुक साक्षीदार नागरिक म्हणून वाटते.
जय हिंद ।
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)













